शरद मैंद यांच्या पुढाकाराने शेतक-यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट;पुरग्रस्त शेतक-यांसाठी अतितात्काळ कार्यवाही करण्याची मागणी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधुन तात्काळ दिले आदेश!

पुसद: तालुक्यातील अनेक गावात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर२०२४ रोजी ढगफुटी होऊन शेतकरी, शेतमजुर व व्यापा-यांचे अतोनात नुकसान झाले होते.अतिवृष्टीनंतर पुसद परिसरातील अनेक गावांची पाहणी शरद मैंद व त्यांच्या सहकार्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन केली.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातुन पुरग्रस्त भागात त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्यांच्या २००० किट्स वाटल्या. शेतकरी व काही शेत मजुरांना आर्थिक मदत केली. ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीन पत्राचे वाटप केले.
तसेच धनकेश्वर नगर मधील मुक्या गीताबाईचे घर वाहून गेले होते म्हणून तिला घर बांधून दिले.
शरद मैंद व त्यांच्या सहकार्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी १९ सप्टेंंबर रोजी शरद मैंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले.
शेतक-यांना ख-या अर्थाने दिलासा द्यावयाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटुन शेतक-यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते.
त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातुन दि. ३ ऑक्टोबरला पुरग्रस्त शेतक-यांच्या शिष्ट मंडळासह शरद मैंद यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंaदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री १२:०० वाजता भेट घेतली.
या प्रसंगी मा. मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. मा. मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की, अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पुर्ववत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पुर्ववत करणे. खोलीकरण, रूंदीकरण,पुरप्रतिबंधक भिंत बांधुन द्यावी अशी विनंती केली.
शिष्टमंडळाची त्वरीत दखल घेऊन मा. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतक-यांची शेती पुर्ववत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण] रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले. व शरद मैंद यांना जिल्हाधिका-यास भेटण्यास सांगितले. शिष्टमंडळात अॅड. बालाजी कपटे, ज्ञानेश्वर हाके, दीपक तायवाडे,पंजाब भाकरे, वैभव ढोकणे,नाना खरात, ज्ञानेश्वर आभाळे,तेजस पाटील, विश्वास बाबूळकर, अवधुत कपटे, दर्शन मोडक, भागवत पुलाते,अमोल चिलकर, बाळु चिलकर होते.
पत्रकार परिषदेला साहेबराव ठेंगे,परमेश्वर जयस्वाल, अनिल ठाकूर नाना जळगावकर,दिपक जाधव,पंडितराव देशमुख, के.जी.चव्हाण सर,यशवंत चौधरी,सुभाष बोडखे साहेब, इश्तियाक भाई,सोमेश्वर जाधव,अजय पुरोहित, उत्तम वानखेडे साहेब,संतोष आंभोरे,संदिप वट्टमवार,भारत जाधव, सुशील रोहडकर,उदय गंधेवार,ललित चव्हाण,नरेंद्र खंदारे, दिपक अवचार , उपस्थित होते



