पुसद शहरातील हिंदू स्मशानभूमीला डंपिंगचे स्वरुप;नगरपरिषद प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
तर हिंदू संघटनांनी या विषयावर मौन बाळगले आहे!

पुसद : नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील पेट्रोल पंपाला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीचे पावित्र्य धोक्यात आले असून समशान भूमीत कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत हा कचरा आता भटकी कुत्री व जनावरे स्मशानभूमीत पसरवत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.तरीही या स्मशानभूमी परिसरातच कचरा टाकला जात आसल्यामुळे या स्मशानभूमीला डंपिंगचे स्वरुप आले आहे.वांरवार नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत जागरूक नागरिकांनी तक्रारी निवेदन दिले तरीही संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.हा कचरा व बेकायदेशीरपणे उभी करण्यात येत आसलेली वाहने व अतिक्रमण उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत सुत्रांकडून झेप न्यूजला मिळालेली माहिती अशी की,हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत मृतदेहांवर केला जाणारा अग्नी संस्कार किंवा मृतदेहाचा दफनविधी हा एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे स्मशानभूमी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी असलेले पवित्र वैकुंठ धाम असते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून नगरपरिषद आरोग्य विभाग प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे या नगर परिषद हद्दीतील पेट्रोल पंपाला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था मात्र दयनीय आहे.या हिंदू स्मशानभूमी परिसराला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या समशानभूमीत अनेक थडगे आहेत तरीसुद्धा स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहे.या स्मशानभूमीची संरक्षण भिंत तोडली गेली आहे तर त्या ठिकाणी आजूबाजूचे हॉटेलवाले, भाजीपाला विक्रेते प्रवासी वाहतूक ऑटो चालक यांच परीसरात लघुशंका करतात तसेच त्या परिसरात कचरा टाकतात त्यामुळे या समशानभूमीला डम्पिंग ग्राउंड चे स्वरूप आले असुन या स्मशानभूमी परिसरात टाकलेला केरकचरा कुजून दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्पामशानभूमीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.या स्मशानभूमीची अत्यंत बिकट दुरावस्था झालेली दिसून येत आहे. माणसाचा अंतिम प्रवास म्हणजे मृत्यू होय. आयुष्यभर जीवन जगल्यानंतर अंत्यविधीसाठी त्याला चांगल्या ठिकाणची जागा उपलब्ध झाल्यास जीवन सार्थकी लागले असे समजल्या जाते. मात्र या समशानभूमीत मरणानंतरही माणसांना यातना सहन कराव्या लागत आहेत तरीही संबंधित नगरपरिषद प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या स्मशानभूमीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. येथे प्रवासी वाहतूक करणारे ऑटो लावले जातात व टाकला जाणारा कचरा आता भटकी कुत्री व जनावरे स्मशान भूमीत पसरवत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. या संदर्भात वारंवार जागरूक नागरिकांनी संबंधित नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी व निवेदन देऊन सुद्धा या नगर परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने धृतराष्ट्राचे सोंग घेतले आहे. तर हिंदू संघटनांनी या विषयावर मौन बाळगले आहे त्यामुळे संबंधित नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाय योजना करून या स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्याला प्रतिबंध करावा, तसेच बेकायदेशीरपणे उभी करण्यात येत असलेले वाहने काढून व अतिक्रमण उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच हिंदू समशानभूमीचे पवित्र जपावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



