ईतर

वीज कंत्राटी कामगारांने पुन्हा उपसले आंदोलनांचे हत्यार;मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा!

पुसद:महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे ४२ हजार वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे ४२ हजार वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता मागील १५ ते २० वर्षापासून अतिशय कमी मानधन वर स्थायी कामगारांच्या रिक्त पदी काम करीत आहेत या कामगारांच्या जीवनाशी निगडित जसे शाश्वत रोजगार तसेच वीज कंत्राटी कामगारांना कायम करणे इत्यादी एकूण १७ मागण्या करिता संयुक्त कृती समितीच्या वतीने दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी कामगारांनी संप केला होता या संपावेळी दि.९मार्च २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी देवगिरी बंगला नागपूर येथे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्या सोबत चर्चा करून तात्काळ विज कंत्राटी कामगाराचे सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासने दिले होते व त्या बाबत वीज कंपनीच्या तिन्ही एम डी.सोबत आपली मीटिंग लाऊन वीज कंत्राटी कामगार यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिल्या मुळे संयुक्त कृती समितीने त्यावेळी संप मागे घेतला परंतु आज पाच महिन्याचा कालावधी उलटूनही तिन्ही वीज कंपनी मधील ४२ हजार कंत्राटी कामगारांचे प्रश्न न सुटल्याने या कंत्राटी कामगारांमध्ये चिड निर्माण होऊन अशांतता निर्माण झालेली आहे त्यामुळे नाईलाजास्तव पुन्हा वीज कंत्राटी संयुक्त कृती समितीच्या वतीने नोटीस देऊन पुन्हा आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे दि. जुलै २०२४ रोजी महानिर्मिती केंद्राच्या गेट वर व महावितरण आणि महापारेषान कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.तर पावसाळी अधिवेशनाच्या वेळी आझाद मैदान मुबई येथे दि.११ जुलै २०२४ रोजी सकाळी१०:३० वाजल्यापासून एकदिवसीय निदर्शने/ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्यास त्याच दिवसापासून संपूर्ण राज्यात कामबंद /संप आंदोलन करण्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शासन प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्याची दाखल घेऊन बैठक लावावी अशी मागणी संयुक्त कृती समिती कडून विनंती करण्यात येत आहे व वीज कंत्राटी संयुक्त कृती समिती चा घटक म्हणून विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संजयभाऊ पडोळे यांनी तिन्ही वीज कंपनी मधील जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे.जर मागण्या मान्य झाल्याशिवाय आता हे आंदोलन मागे घेणार नसल्याचापवित्रा संघटनेचे राज्य अध्यक्ष संजयभाऊ पडोळे यांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close