ईतर

इस्त्रोचे चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले 

नवी दिल्ली(वृत्तसेवा):भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरले असल्याने, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. चंद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले हे यश आल्याने भारत हा जगातील चौथा देश ठरला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.याआधी अमेरिका, रशिया आणि चीन हेच चंद्रावर यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग करू शकले होते. आता या यादीत भारताने देखील स्थान मिळवलं आहे. पण या तीनही देशांना आजवर जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आहे. ते म्हणजे चंद्राच्या अत्यंत अवघड अशा दक्षिण ध्रुवावर भारताने आपले यान उतरवलं आहे. भारताच्या १४० कोटी लोकांच्या प्रार्थना आणि इस्रोच्या १६५०० शास्त्रज्ञांच्या चार वर्षांच्या मेहनतीचे फळ अखेर मिळाले आहे.भारतासह देशवासियांसाठी हा ऐतिहासिक आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश साजरा करत आहे.

इस्रोने सर्वांचे मानले आभार…                             या ऐतिहासिक मोहिमेच्या यशासाठी इस्रोचं जगभरातून कौतुक होत आहे. या दरम्यान इस्रोने एक्स पोस्ट करत, या मोहिमेत मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांचं आभार मानले आहे.

असं झालं विक्रमचं लँडिंग:

▪️विक्रम लँडरने २५ किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ११.५मिनिटे लागली.

 

▪️७.४ किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग ३५८ मीटर प्रति सेकंद होता. पुढील प्रवास ६.८ किलोमीटरचा होता.

▪️६.८ किमी उंचीवर, वेग ३३६ मीटर प्रति सेकंद कमी झाला होता. पुढील स्तर ८०० मीटर होता.

▪️८०० मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधली.

▪️१५० मीटर उंचीवर लँडरचा वेग ६० मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे ८०० ते १५० मीटर उंचीच्या दरम्यान होतं.

▪️६० मीटर उंचीवर लँडरचा वेग ४० मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे १५० ते ६० मीटर उंचीच्या दरम्यान होता.

▪️१० मीटर उंचीवर लँडरचा वेग १० मीटर प्रति सेकंद होता.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग१.६८ मीटर प्रति सेकंद होता.

▪️इस्त्रोच्या( ISRO)शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने हे मिशन आखलं होतं त्यानुसार विक्रम लँडरचं लँडिंग झालं.

▪️चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

▪️आतापर्यंत फक्त चार वेळा चंद्रावर यान उतरविण्यात आलं आहे. ज्यामध्ये आता भारताचाही नंबर लागला आहे.                     विक्रम लँडरवरील चार पेलोड काय काम करतील?                                                             १. रंभा (RAMBHA): हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.                              २. चास्टे (ChaSTE): हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.                    ३. इल्सा (ILSA): हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय हालचालींबाबत तपासणी करेल.           ४. लेझर रेट्रोरिफ्लेक्टर एरे (Laser Retroreflector Array (LRA): तो चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.      प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत, ते काय करणार?                                                           १. लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS): हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. तसेच खनिजांचाही शोध घेईल.

२. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS): ते घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह. ते लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जातील.        शास्त्रज्ञांसाठी काय फायदा?                       एकूणच, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर एकत्रितपणे चंद्राचे वातावरण, पृष्ठभाग, रसायने, भूकंप, खनिजे इत्यादींचा अभ्यास करतील. यामुळे इस्रोसह जगभरातील शास्त्रज्ञांना भविष्यातील अभ्यासासाठी माहिती मिळणार आहे. संशोधन करणे सोपे जाईल. ही बाब शास्त्रज्ञांसाठी फायद्याची ठरली आहे.          देशाचा काय फायदा होईल?                          जगात आतापर्यंत केवळ तीनच देश चंद्रावर यशस्वीरित्या उतरले होते. अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत युनियन) आणि चीन. आता भारताचे चांद्रयान-३ सॉफ्ट लँडिंगमध्ये यशस्वी झाले आहे. त्यामुळे सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. तर दक्षिण ध्रुवाच्या क्षेत्रात उतरणारा हा जगातील पहिला देश बनला आहे. त्यामुळे या भागातील महत्त्वाची माहिती ही फक्त भारताला मिळणार आहे.                                इस्रोचा काय फायदा होईल..

इस्रोचा(ISRO) हे जगभरात आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक प्रक्षेपणासाठी ओळखले जाते. आतापर्यंत ३४ देशांचे ४२४ परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. सोबत १०४ उपग्रह सोडले आहेत. तेही त्याच रॉकेटमधून. चांद्रयान-१ ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. तर चांद्रयान-२ चे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे. त्यामुळेच चांद्रयान-3 साठी लँडिंग साईट सापडली. मंगळयानाचा महिमा संपूर्ण जगाने पाहिला आहे. चांद्रयान-३ च्या यशामुळे जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांमध्ये इस्रोचे नाव समाविष्ट झालं आहे.                       सर्वसामान्यांना होणार मोठा फायदा.          पेलोड्स म्हणजेच चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या अंतराळ यानांमध्ये बसवलेली उपकरणे नंतर हवामान आणि दळणवळण उपग्रहांमध्ये वापरली जातात. संरक्षण संबंधित उपग्रहांमध्ये घडते. नकाशा बनवणाऱ्या उपग्रहांमध्ये आढळते. ही उपकरणे देशातील लोकांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्यामुळे संपर्क यंत्रणा विकसित होण्यास मदत होते. देखरेख करणे सोपे होते.                                 नासाने केलं अभिनंदन..                         अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानेही इस्रोचं अभिनंदन केलं आहे. नासाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी एक्स पोस्ट केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश झाल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. या मोहिमेत तुमची साथ देण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आनंदी असल्याचं ते म्हणाले.

 

‘हा अविस्मरणीय क्षण’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण शंखनादाच आहे. नव्या भारताच्या जयघोषणाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा क्षण आहे. हा १४० कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

शरद पवारांनी केलं कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील ‘चांद्रयान-३’च्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी या मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक केलं.चंद्रयान -३ ने चंद्रावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केली आहे. या लँडिंगवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या इस्त्रो सारख्या संस्थेमुळे ही मोहिम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया शरद पवांरानी दिली आहे. तसेच जवाहरलाल नेहरू यांनी देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केले आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले, या गोष्टीचे आज चीज झाल्याचेही शरद पवार म्हणाले आहे. एकूणच शरद पवार यांनी या मोहिमेचे क्षेय पंतप्रधान मोदींना न देता जवाहरलाल नेहरूंना दिले आहे.कधी यश येते, कधी अपयश येते. य़श मिळालं म्हणून जमिनीवरचे पाय या देशाच्या वैज्ञानिकांनी कधी हलवले नाहीत आणि अपयश आले म्हणून कधी नाउमेद झाले नाही, या त्यांच्या अखंड कष्टातून आणि प्रयत्नातून, आज चांद्रयान -३ मिशन यशस्वी झाल्याचे म्हणत शरद पवार यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले. तसेच भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचा मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो,असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.मला नेहरू सेंटरमध्ये चांद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी मिळाली, याची माहिती देखील शरद पवारांनी दिली. तसेच आजचे चांद्रयान मोहीम ही जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टकोणामुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या इस्रो सारख्या संस्थेमुळे शक्य झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्यामुळे हे शक्य झाल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असलं पाहिजेत हे इस्रोने दाखवुन दिल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत.चांद्रयानच्या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून, देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत, त्यांचे हे खरं यश आहे, यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिले पाहिजे असे विधान करून शरद पवार यांनी करून मोदी यांना टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close