सरपंच सचिवांच्या मनमानी कारभारामुळे गट ग्रामपंचायत बारभाई राम भरोसे

यवतमाळ: जिल्ह्यातील आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत बारभाई सचिव व सरपंच यांच्या मणमाणी कारभाराणे गट ग्रामपंचायत बारभाई येतील उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्याणी गटविकास अधिकारीणा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे गावांत अनेक समस्या असताना ग्रामपंचायत व प्रशासनाकडून समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे सरपंच व सचिवाकडुण सदस्याला विश्वासात न घेता आपल्या मर्जीने कामे केली जातात ग्रामसभा न घेता आपल्या जवळच्या व मर्जीतील लोकांना विहरीचे ठराव देण्यात येत आहे सरपंच व सचिव याना वारंवार सांगुन सुद्धा गावातील तुबड भरलेल्या नालीची सफाई करण्यात येत नाही सार्वजनिक ठीकाणावरील पत दिवे बंद असल्याने ग्रामस्थांना अधाराचा सामणा करावा लागत आहे गावातील समस्या सोडविण्यासाठी सरपंच व सचिवाना सागीतले असताना ग्रामस्थांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येतात असे आरोप निवेदनातुण करण्यात आले आहे ग्रामपंचायत सचिव सतत गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली आहेत त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी गावाकडे लक्ष केंद्रित करावे अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती आर्णी बिडीयो कडे निवेदनाद्वारे अर्ज करण्यात आले आहे निवेदन कर्ते उपसरपंच सौ.चंदा विकास जाधव सौ.जया निलेश जाधव सौ. गायत्री प्रविण चव्हाण सौ. सपना किशोर राठोड श्री.शकर दासु पवार सदस्य ग्रामपंचायत बारभाई व ग्रामस्थ यांच्या सहाय्याचे निवेदन देण्यात आले.



