ईतर

पंतप्रधान किसान समृध्दी सुविधा केंद्रे शेतकऱ्यांना वरदान ठरणार- जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे

◆आता एकाच दुकानात मिळणार सर्व कृषिसाहित्य..

पुसद : पंतप्रधान किसान समृध्दी सुविधा केंद्र देशभरात २ लाख ८ हजार ठिकाणी सुरु होणार आहेत. देशभरातील शेतक-यांच्या उज्वल भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना दर्जेदार बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके व अन्य कृषिनिगडीत अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या,तालुक्याच्या व ग्रामस्तरावरील कृषी साहित्य विक्रेते दुकानांचे रूपांतर आता पंतप्रधान किसान समृध्दी सुविधा केंद्रात होणार असल्याची माहिती नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी दिली. ते दि.२६ जुलै रोजी स्थानिक हॉटेल दिपसंध्या येथे आयोजित पत्रकार परिषेदेत बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता कृषी निगडित साहित्यासाठी कृषी केंद्र,हार्डवेअर अशा विविध दुकानात भटकंती करावयाची गरज भासणार नसून सर्व कृषिसाहित्य एकाच दुकानात मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषेदेत सांगितले. यावेळी प्रदेश कार्येकारिणी सदस्य माजी आ.राजेंद्र नजरधने, विनोद जिल्हेवार, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी ग्यानचंदानी, माजी जीप सदस्य अमेय नाईक, ऍड.विश्वास भवरे, निळकंठ पाटील, विनोद जिल्हावार, अश्विनभैया जैयस्वाल, लुकाध्यक्ष नंदू काळे,माजी नगरसेविका डॉ. सौ. रुपाली जैस्वाल, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा दीपाली जाधव,शहराध्यक्ष दीपक परिहार,निलेश पेन्शनवार,पंजाब भोयर ओम प्रकाश शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर आ.ऍड.निलंय नाईक हे अधिवेशनात उपस्थित असल्यामुळे पत्रकार परिषदेस अनुपस्थित होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दि. २७ जुलै, २०२३ रोजी राजस्थान मधून या योजनेच्या देशभरातील केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत हे विशेष..शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी- बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे.

पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे –
शेतक-यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणार.

शेतक-यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे. किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्या केंद्रांशी शेतक-यांना जोडून देणे., शेतक-यांना लागणा-या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटर द्वारे उपलब्ध करून देणे. शेतक-यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे., केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे., खते, औषधे, किटक नाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे.

पंतप्रधान किसान समृध्दी योजनेची रूपरेषा खालीलप्रमाणे–
देश भरात जिल्हा, तालुका आणि खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी २.८ लाख दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रूपांतर करण्यात येणार आहे.सद्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रााचे रूपाांतर पंतप्रधान समृद्धी किसन केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे.उर्वरित १.८ लाख खत विक्री दुकानाचे रूपाांतर या २०२३ वर्षाअखेरीस किसान समृद्धी केंद्रामध्ये करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close