ईतर

बंजारा समाजाचं आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न केल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईकांसह त्यांच्या सुविधा पत्नीला समाजांच्या रोषाला जावे लागते सामोरं!

पुसद : शहरासह मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी नाईक घराण्याचे वारसदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न केल्यामुळे बंजारा समाजातील तरुण पिढीचा वाद ओढवून घेतला आहे.त्यामुळे राज्यमंत्री इंद्रनील नाईकांसह त्यांच्या सुविधा पत्नीला समाजांच्या रोषाला सामोरं जावे लागत आहे.याविषयावर एवढे वादंग उठले आहे की हे वादंग प्रसार माध्यमांपासून तर, सोशल माध्यमांपासून ते सामाजिक चळवळीपर्यंत आणि सामाजिक चळवळीपासून तर, सर्वसामान्यांना पर्यंत, अशा सर्व क्षेत्राला व्यापून राहिलेले आहे. खरे तर, या वादावर लिहिण्याची आमची काही इच्छा नव्हती; परंतु, जेव्हा मतदारसंघातील एक प्रमुख समाज व त्यांच समाजातील एक सत्ताधारी अजय घराण्याला एखाद्या वाद घेरतो, तेव्हा त्याविषयी आपण तटस्थ राहू शकत नाही! त्यावर निश्चितपणे आपलं काहीतरी मत नोंदवलं पाहिजे, परंतु या प्रकरणाला तर बंजारा समाजातील तरुण पिढीच्या कार्यकर्त्यांनी वांरवार निवेदन कींवा पत्रकार परिषद आयोजित करून हा मुद्दा ज्वलंत ठेवले आहे.त्या भूमिकेतूनच आज या विषयावर लिहीत आहे.

 

पुसद शहरात श्री.संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उसात राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांच्या नेतृत्वात साजरी करावी यासाठी बंजारा समाजातील तरुण पिढीतील काही तरुण कार्यकर्ते आग्रही होते. पण या राजघराण्यातील या नेत्यांनी या तरुण पिढीच्या हाकेला-ओ न दिल्यामुळे हे तरुण पिढीतील कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून ज्या नाईक घराण्यांनी बंजारा समाजाच्या भरोशावर गेल्या ७२ वर्षांपासून म्हणजे अगदी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच नाईक कुटुंबाने या पुसद मतदारसंघावर आपला वर्चस्व समाजाच्या भरोशावर टिकवून ठेवले त्याच बंजारा समाजाच्या आराध्य दैवत असलेल्या श्री संत सेवालाल महाराज जयंतीचा या नाईक घराण्याला विसर पडला. या मतदारसंघातील बंजारा समाज हा नाईक घराण्यातील प्रत्येक नेत्यांना दैवत मानतो त्यामुळे या घराण्यातील कोणत्याही नेत्यांचा शब्द अंतिम असतो परंतु बंजारा समाजाचं आराध्य दैवत असलेल्या श्री.संत सेवालाल महाराज यांची जयंती दि.१५फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी श्री.संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात न आल्याने पुसद शहरासह तालुक्यातील बंजारा समाजामध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट निर्माण झाली आहे.याला कारणही तसंच आहे.श्री.संत सेवालाल महाराज यांच्या जयंती साजरी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी बंजारा समाजातील काही समाज बांधव ( तरुण मंडळी ) राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यावर गेले असता,राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सुविधा पत्नी पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,“आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित दादा पवार यांचे एका अपघात दुर्दैवी दुःखद निधन झाले आहे, त्यामुळे आम्ही सुतक पाळत आहो आणि आमची उत्सव साजरा करण्याची हिंमत नाही,” असे सांगितले. त्यावेळी राज्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्यासाठी गेलेल्या बंजारा समाजाच्या तरुणांना तेथील काही व्यक्तींनी अरेरावी करत हाकलुन देण्यात आले. तसा समाज माध्यमांवर व्हीडिओ सूध्दा व्हायरल झाला होता त्याचवेळी समाजातील काही तरुणांनी कोणीतरी शशांक व नरेंद्र नामक व्यक्तीशी महामानवाच्या जंयती बाबत चर्चाही केली होती त्यांनी सुध्दा समाजातील तरुणांना समजविण्या एवजी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्षा सौ मोहिनीताई नाईक यांनी व त्यांच्या ‘चेल्याचंपाट्यांनी’ जाणिवपूर्वक बंजारा समाजाचं आराध्य दैवत असलेल्या श्री.संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यास समाजातील काही तरुण मंडळींना विरोध केल्याबद्दल बंजारा समाजातील नव्या पिढीच्या तरुणांमध्ये नाराजी पसरली होती.त्याच अनुषंगाने बंजारा समाजातील काही तरुणांनी दि.२४फेबुरवारी२०२६रोजी पुसद तहसीलदार व पोलीस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन पुसद येथे निवेदन दिले होते की,राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्षा सौ.मोहिनीताई नाईक यांनी बंजारा समाजाची माफी मागावी अन्यथा बंजारा समाजाच्या वतीने निषेध करण्यात येईल परंतु राज्यमंत्र्यांनी कीवा त्यांच्या पत्नीने समाजाचे सेवक या नात्याने या तरुणांच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही त्यामुळे समाजातील काही तरुणांनी पुन्हा आज दि.२७फेबुवारी २०२६रोजी सामंत नगर येथील आदित्य जाधव यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन काही मुद्दे उपस्थित केले आहेत. राज्यमंत्र्यांनी व त्यांच्या पत्नीने त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांचे निधन झाल्याचे सुतक पाळले तर आमच्याच आराध्य दैवतासाठी हे सुतक सोडून बाहेर पडू शकले नाही परंतु त्याच दि. १४ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे श्री.संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन सोहळ्यास राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब व नगराध्यक्ष सौ.मोहिनीताई नाईक उपस्थित होते. तर दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली होती. याच दरम्यान त्यांनी कित्येक विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आसल्याचे पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले. त्यामुळे आमच्या बंजारा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.१४ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांना सुतक पाळले नाही तर १५ फेब्रुवारी रोजीच आमच्या समाजाचं आराध्य दैवत असलेले श्री.संत सेवालाल महाराज जयंतीसाठीच दुखवटा कां.?आडवा आला.? हा प्रश्न समाजांतील या नेत्यांना विचारू लागले आहे. बंजारा समाजाच्या आराध्य दैवताबाबत हा दुजाभाव का.?गाव-खेड्यात व तांड्यात राहणारा बंजारा समाज हाच तो समाज आहे, ज्यांच्या भक्कम व एकतर्फी पाठिंब्यामुळे नाईक परिवार १९५२ पासून आजतागायत सत्तेत आहे. संत श्री सेवालाल महाराज नेहमी म्हणायचे की, “गोरगरिबांना लुटून खाईल, त्यांची सात पिढी नरकात जाईल.” आज समाजाच्या नावावर निवडून येऊन समाजालाच दुय्यम लेखण्याचे कार्य या नाईक परिवारातील या नेत्याकडून सुरू असल्याची भावना सुद्धा या तरुणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नेत्यांनी समाजाची माफी मागावी यासाठी निवेदन दिले होते.मात्र या नेत्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे समाजात त्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे समाज बांधवांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि या परिस्थितीवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्याच बरोबर पुसद शहराला घेऊन महानायक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे सुपुत्र वडीलाचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देश्याने स्व:ता पुसद नगरीत दाखल होतील महानायकाचे खरे वारसदार निरंजन नाईक साहेब हे आमच्या बंजारा समाजासाठी दैवत असून ते समाजाला संबोधित करण्या करिता लवकरच पुसद शहरात येणार असल्याची या पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली. आणि आमच्या समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती राज्यमंत्र्याच्या जाणीवपूर्वक आडमुठे धोरणामुळे या शहरात साजरी होऊ शकली नाही त्यामुळे त्यांना समाज त्यांना कधीही माफ करणार नाही अशी माहिती आदित्य जाधव यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close