वखार महामंडळच्या बहुचर्चीत बनावट पावती प्रकरणी अधिक्षकांसह १६ आरोपीची निर्दोष मुक्तता यवतमाळ न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल!

पुसद/प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य वखार महामंडळचे गोडाउन येथे धान्य साठा न ठेवता वखार केंद्र पुसद येथील प्रभारी साठा अधिक्षक राजेश कुर्वे यांनी धान्य व्यापारी नामे मधुसुदन मोदानी रा. दिग्रस, मुरलीधर कांबळे, किशोर तोष्णीवाल, मनोज बजाज, श्याम बजाज, विलास दामोधरे, संतोष राठी, राजकुमार जाजु, ओंकार तोष्णीवाल, मनोज जैन, संदीप जैन, सुरेष जाजु, भगवानदास अटल, सुनील जाजु, मदनलाल जाजु सर्व रा. पुसद यांचे सोबत संगनमत करुन बनावट वखार पावत्या तयार केल्या व त्या पावतीवर बॅन्काकडुन तारण कर्ज उचल केली व कर्जाचे वखार महामंडाळा वर दायीत्व लादले अशा आशयाची तक्रार सन २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळ विभागीय कार्यालय नागपुरचे उपव्यवस्थापक राजेश्वर गोंविदराव आळशी यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे तकार दिल्याने वर नमुद प्रभारी साठा अधिक्षक व व्यापारी असे एकुण १६ आरोपी विरुध्द भारतीय दंड विधानचे धारा ४२०, ४६८, ४०९ सह कलम ३४ अनुसार आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
सदरच्या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन पुसद शहर येथील ठाणेदार रमेश पावडे व पी. आय. चव्हाण यांनी केला व प्रकरणात आरोपी विरुध्द भरपुर पुरावे आढळुण आल्याने सदरच्या प्रकरणात दोषारोपपत्र सादर केले. सदरच्या प्रकरणात १२९८४ धान्याच्या गोण्याचे रक्कम रुपये ३ करोड चे दायीत्व निर्माण झाल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला होता. आरोपीनी एकमेकाशी संगणमत करुन धान्याचा साठा न ठेवता तब्बल ५६ बनावट पावत्या तयार केल्या व त्या पावत्या बॅन्केत तारण ठेवुन त्या वर कर्जाची उचल केली व स्वताच्या वैयक्तीक फायदया करीता व महा मंडाळाला हानी पोहचीवली असा आरोप करण्यात आला. सदरचे सर्व आरोपी हे पुसद शहारातील प्रतिष्ठीत असे धान्य व्यापारी आहेत त्यामुळे सदरचे प्रकरण हे अतिशय चर्चेचा विषय झालेले होते.सदरचे प्रकरण हे चालीवण्या करीता यवतमाळ येथील मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. एम. शहा यांच्या न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले होते. सदरच्या प्रकरणात सरकारी अभियोक्ता व्दारे ३ साक्षदार फिर्यादी राजेश्वर आळशी, शलेंद्र आहेर बुलढाणा अर्बन को ऑप केडीट सोसायटी पुसदचे शाखा यवस्थापक, पोलीस स्टेशन पुसद शहर येथील तपासी अधिकारी ठाणेदार रमेश पावडे यांची साक्ष नोंदीवण्यात आली.सरकारी अभियोक्ता व आरोपी चे विधीतज्ञ यांची बाजु एकुण प्रकरणात दाखल केलेले पुरावे दस्तऐवज यांचे अवलोकन करुन आज दि. ०९/०९/२०२४ रोजी यवतमाळ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्रीमती ए. एम. शहा मॅडम यांनी आरोपी विरुध्द कोणतेहि आरोप सिध्द होत नसल्याने सर्व १६ आरोपीची प्रकरणातुन निर्दोष मुकत्ता केली. आरोपी राजेश कुर्वे साठा अधिक्षक तर्फे अॅड. जे. एम. वैदय नागपुर यांनीतर धान्य व्यापारी आरोपी मधुसुदन मोदानी रा. दिग्रस, मुरलीधर कांबळे, किशोर तोष्णीवाल, मनोज बजाज, श्याम बजाज, विलास दामोधरे, संतोष राठी, राजकुमार जाजु, ओंकार तोष्णीवाल, मनोज जैन, संदीप जैन, सर्व रा. पुसद यांच्या तर्फे अॅड. सतीश एस. भंडारी पुसद यांनी न्यायालयात भक्कम पणे बाजु मांडली. एकीकडे न्यायालयीन कामकाज जलद चालीवण्यावर जोर दिल्या जात असतांना असे प्रकरण निकाली लागण्या करीता तब्बल १८ वर्षे कालावधी लागला असला तरी उशीरा का होईना सर्व १६ आरोपीने त्यांना न्याय मिळाल्याने न्यायालया बाबत आपले आदर व्यक्त केले आहे. एकीकडे आरोपी यांना न्यायालया मार्फत पुर्णतः दिलासा मिळालेला आहे. परंतु ज्या वखार महा मंडळाच्या पावतीवर बॅन्कानी तारण कर्ज दिले ते कर्ज परतफेड करण्याची जवाबदारी आता महाराष्ट्र राज्य वखार महा मंडळावर जात असल्याने नेमके आता दायीत्व कोणाचे ? आणि जर या फसवणुकी बाबत नुकसान होत असेल तर ते महा मंडाळाचे होणार की तारण कर्ज देण्याऱ्या बॅन्काचे होणार ? या बाबीकडे सगळयांचे लक्ष लागलेले आहे.



