क्राइम

पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी! वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

पुसद : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बसवलेली सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. वाहतूक शिपाई यांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियमित विस्कळित सुरू. वाहनांची वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारती मैंन्द नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून लाखो रुपये खर्च करून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी चौकात सिग्नल यंत्रणा बसविली. परंतु या यंत्रणेची जबाबदारी असलेल्या बसंबंधित वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे ती ही यंत्रणा बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ वाहतूक शाखा पुसद अंतर्गत असलेल्या शहरातील चौकात एकही वाहतूक कर्मचारी कुठल्याच चौकात दिसत नाही. त्यामुळे यवतमाळ वाहतूक शाखा पुसद फक्त कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी वर्दळ नेहमीच वाढलीआसते तर शहरात सध्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकाची ही गर्दी वाढली आहे. एकीकडे जड वाहनांची ये -जा सुरू असते तर तर मेन बाजारपेठ, तहसील कार्यालयावर जाण्यासाठी आणि तसेच बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक रस्ता असल्याने तसेच चौकातच बस थांबात असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा ये -जा सुरू असते हा चौक कायमच नागरिकांनी गजबजलेले असतात.तसेच दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे चौकात वाहनांची खूप गर्दी वाढली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे. परंतु, हे सिग्नल बंद असल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट वाहतूक प्रशासन पाहत आहे का..?असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे. या वाहतुकीच्या प्रश्नाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे शहरातील चौका चौकात जाम लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close