महाविकास आघाडीतील सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या उच्चशिक्षित उमेदवार प्रा.अर्चना हरीमकर यांच्यामुळे पुसद न.प. प्रभाग १५ ची निवडणूक लक्षवेधी!

पुसद : नगर पालिकेची निवडणूक यंदा चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उभाठा या महाविकास आघाडीच्या युतीमुळे व भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या बिघाडीमुळे शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून प्रभाग १५ मध्ये निवडणूक लढवीत असलेल्या उच्चशिक्षित प्राध्यापक अर्चना दीपक हरीमकर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग १५ ची निवडणूक शहरात चर्चेचा विषय ठरली असून ह्या निवडणूकीत या प्रभागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तीनही उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने सहज निवडून येतील अशी जनमानसात चर्चा आहे.पुसदच्या एका नामांकित शाळेत प्राध्यापक सौ .अर्चना दिपक हरीमकर ह्या सुमारे २५ वर्षापासून अध्यापनाचे काम करीत असून त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडलेल्या असल्याने व त्यांच्या प्रभागात शाळेतील कर्मचारी वर्ग आणि विविध सामाजिक संघटनेतील सदस्य यांचा त्यांना वाढता पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील तीनही उमेदवारांना ही निवडणूक फार सोपी जात आहे.प्राध्यापक सौ. अर्चना हरीमकर एम .एस .सी. एम एड. असून उत्कृष्ट वक्तव्य, दांडगा संपर्क आणि विकासाचे ध्येय घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “विकसित पुसद, आनंदी नागरिक हेच माझे ध्येय आहे. मी केवळ नगरसेवक बनण्यासाठी नाही, तर पुसद च्या विकासासाठी कटिबद्ध आहे.” महाविकास आघाडीचे श्री शरद मैद यांच्या नेतृत्वात आणि त्यांनी केलेल्या पुसद च्या विकासाचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे. प्रा. अर्चना हरीमकर यांनी पुसदमधील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीटंचाई ही केवळ समस्या नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकाळात नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन जलस्रोत व वितरण प्रणाली सुधारण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. पुसदला स्वच्छ व सुंदर शहर बनवणे; खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दर्जेदार रस्ते आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे. नगरपरिषदेचा कारभार १००% पारदर्शक ठेवणे आणि नागरिकांच्या समस्यांचे जलद निवारण करण्यासाठी ई-प्रशासन प्रणाली लागू करणे.प्रा. अर्चना दिपक हरीमकर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “मी आश्वासने देणार नाही, तर कृती करून दाखवेन. माझा भर सकारात्मक राजकारणावर आहे. तुमचे एक मत केवळ नगरसेवक निवडणार नाही, तर आपल्या शहराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य निश्चित करणार आहे. मी पुसदला महाराष्ट्रातील एक आदर्श शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यापुढे म्हणाल्या की मी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी २४x ७ दिवस सतत उपलब्ध राहील. या निवडणुकीत मतदार राजा शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला निवडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून तूर्तास तरी महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढवीत असल्याने व महायुतीत फारकत झाल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे.



